[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते:
![गैरसमज १: होमिओपॅथी उपचार संथगतीने काम करते:](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
होमिओपॅथीने गेल्या काही वर्षांमध्ये तीव्र आजाराच्या उपचारांमध्ये उत्कृष्ट परिणाम दाखवले आहेत. परिणामी जुलाब, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखे आजार होमिओपॅथिक उपचारांसह त्वरीत बरे होत आहेत. संधिवात, दमा, अलर्जी, चिंता आणि नैराश्य यासारख्या दीर्घकालीन आजारांवर उपचार होण्यास वेळ लागतो, कारण या आजारांवर मुळापासून उपचार केले जातात.
गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे:
![गैरसमज २: होमिओपॅथी हा फक्त प्लेसबो इफेक्ट आहे:](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
हा एक सामान्य गैरसमज आहे, ज्यामधून निदर्शनास येते की होमिओपॅथीचे परिणाम फक्त मानसिक असतात आणि त्यांचा शरीरातील शारीरिक बदलांशी काहीही संबंध नाही.
होमिओपॅथीच्या परिणामकारकतेची वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी करण्यासाठी अनेक क्लिनिकल आणि डबल-ब्लाइण्ड तपासण्या करणत आल्या आहेत. तसेच, होमिओपॅथिक उपचाराने बरे झालेल्या लाखो केसेस वैद्यकीय डेटाद्वारे प्रमाणित केल्या गेल्या आहेत आणि ते त्याच्या वैज्ञानिक परिणामकारकतेचा पुरावा आहेत.
(वाचा – महिन्यातून किती वेळा गर्भनिरोधक गोळ्या घेणे ठरते महिलांसाठी योग्य, दुष्परिणाम घ्या लक्षात)
गैरसमज ३: होमिओपॅथी औषधे सुरक्षित नाहीत:
![गैरसमज ३: होमिओपॅथी औषधे सुरक्षित नाहीत:](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
होमिऑपथी हे जगातील सर्वात सुरक्षित औषधोपचारांपैकी एक आहे. याचे कोणतेही घातक किंवा नकारात्मक परिणाम होत नाहीत, कारण ते डायल्यूट केले जाते आणि लहान डोसमध्ये दिले जातात. पण स्वत:हून उपचार सुरू करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होमिओपॅथचा सल्ला घ्यावा.
(वाचा – Vitamin B12 साठी केवळ मांस-मच्छीची गरज नाही, ५ शाकाहारी पदार्थांमधून मिळेल तगडे विटामिन)
गैरसमज ४: होमिओपॅथीचा इतर उपचारांसह वापर करता येऊ शकत नाही:
![गैरसमज ४: होमिओपॅथीचा इतर उपचारांसह वापर करता येऊ शकत नाही:](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
होमिओपॅथीचा वापर इतर उपचारांसोबत करता येतो. होमिओपॅथीकडे येणारे रुग्ण अनेकदा दीर्घकालीन तक्रारी घेऊन येतात आणि ते आधीच इतर प्रकारच्या औषधांचे सेवन करत असतात.
ते सेवन करत असलेली काही अॅलोपॅथिक औषधे अचानक बंद करता येत नाहीत. रासायनिक औषध सेवन करणे थांबवल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, होमिओपॅथीचा अवलंब करत इतर प्रकारचे उपचार हळूहळू थांबवणे उत्तम आहे.
(वाचा – गॅझेट्सच्या अतिवापराने ६०% तरुणांना मणक्याच्या समस्या, चिंताजनक परिस्थिती तज्ज्ञांचा दावा)
गैरसमज ५: होमिओपॅथिक उपचारांमुळे आहाराबाबत पथ्ये पाळावी लागतात:
![गैरसमज ५: होमिओपॅथिक उपचारांमुळे आहाराबाबत पथ्ये पाळावी लागतात:](https://static.langimg.com/thumb/67144443/Maharashtra Times.jpg?width=540&height=405&resizemode=75)
होमिओपॅथिक औषधोपचार करताना कोणतीही विशिष्ट आहाराविषयक पथ्ये पाळावील लागत नाही. आजारानुसार आहारविषयक पथ्ये पाहण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांना मीठाचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते आणि मधुमेह असलेल्या रूग्णांना गोड पदार्थ आणि कार्ब्सचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते.
बहुतांश होमिओपॅथ चांगल्या परिणामकारकतेसाठी होमिओपॅथिक औषधे घेण्यापूर्वी अर्ध्या तासाच्या अंतराची शिफारस करतात. होमिओपॅथी सुरक्षित, किफायतशीर आणि सहज उपलब्ध असल्याने ही एक औषध प्रणाली आहे.
[ad_2]